Ad will apear here
Next
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार
पालघर : सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील  ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ जुलै रोजी त्यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत २८ जुलै रोजी या दोन प्रगतिशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, स्थायी समितीचे सभापती अशोक वडे, सभापती सुरेश तारे, सभापती धर्म गोवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देवऋषी, स्थायी समिती सचिव, सर्व सदस्य आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OYYUBE
Similar Posts
डहाणू येथील विद्यार्थ्यांची सायन्स एक्स्प्रेसला भेट डहाणू (पालघर) : डहाणू येथील बाहारे आणि जामशेत, सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे १९ जुलै रोजी ‘विज्ञान एक्सप्रेस’ला भेट दिली. पालघर जिल्हा परिषद आणि रोशनी फाउंडेशन यांनी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही विज्ञान विशेष गाडी
‘उघड्यावर शौचास प्रतिबंध’ डिजिटल व्हॅनचे उद्घाटन पालघर : ‘जिल्ह्याची हागणदारीमुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल गतिमान होऊन सर्वत्र स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी कार्यरत राहू. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून पालघर जिल्हा परिषदेचे कामकाज पारदर्शकरित्या करण्यात येईल,’ असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
राष्ट्रीय रूरबन मिशनअंतर्गत कासटवाडीची निवड जव्हार (पालघर) : केंद्र शासन पुरस्कृत श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानच्या अंमलबजावणीसाठी जव्हार तालुक्यातील ‘कासटवाडी’ समूहाची निवड करण्यात आली आहे.   आदिवासी भागातील गावसमूहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे, शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे हा या अभियानाचा मुख्य उदेश आहे. या योजनेंतर्गत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language